करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरात सकल मुस्लीम समाज यांच्या कडुन मुस्लीम समाजातील मस्जिद,मदरसा, व वक्फच्या इतर मालमत्ता संदर्भात अडी अडचणी सोडविण्यासाठी भव्य अशा मेळाव्याचे आयोजन सकल मुस्लीम समाज करमाळाचे मार्गदर्शक तालुका अध्यक्ष हाजी कलीम काझी सर यांनी आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे अध्यक्ष शफीक भाई काझी, महाराष्ट्र राज्यचे जमियत उलमा ए हिंद उपाध्यक्ष हाफीज सिद्दीकी, सुलेमानिया मस्जिदचे मौलाना फारुख रझा,आयशा मस्जिदचे मुप्ती अबु रेहान, मौलाना सय्यद अली, सकल मुस्लीम समाज चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद, मौलाना रफीक इत्यादी मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सकल मुस्लीम समाज करमाळा चे मार्गदर्शक हाजी कलीम काझी सर यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मस्जिद,मदरसा, आणि इतर मालमत्तांच्या संदर्भात त्या जागेवर वक्फ बोर्डाकडून बेरोजगार युवकांसाठी उद्योगधंद्यांकरिता गाळे बांधुन द्यावे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारचे तीन किंवा चार तालुके मिळून शैक्षणिक संकुल उभारण्यात यावे, मुस्लीम समाजातील आणि हिंदू समाजातील गरीब कुटुंबातील लोकांकरिता वक्फ बोर्डाच्या जागेवर उत्तम अशा दर्जाचे आरोग्य सुविधा देण्यासाठी हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी, मुस्लीम समाजातील बेरोजगार युवकांसाठी व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळच्या माध्यमातून शुन्य टक्के दराने कर्ज देण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. वक्फ बोर्डाने आता आपल्या जागेवर व्यवसायिक पद्धतीचा अवलंब करून वक्फ बोर्डाची आर्थिक स्थिती मजबूत करुन समाजाच्या उपेक्षित वर्गाच्या उन्नती करिता काम करावे अशी अपेक्षा केली आहे.

यावेळी मुफ्ती अबु रेहान यांनी मस्जिद आणि मदरसा संदर्भात वक्फ बोर्डाच्या ऑफीस मध्ये नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा तसेच महाराष्ट्रातील तमाम मस्जिद आणि मदरसा मधील शिक्षक मौलाना यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान म्हणून मानधन देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी वक्फ बोर्डाचा अध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मस्जिद, मदरसा आणि वक्फच्या नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून किंवा तालुक्यातुन नोंदणी करिता किंवा वक्फ च्या इतर कामांसाठी मुख्य कार्यालय संभाजी नगर येथे न येता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता वक्फ कार्यालय सुरू केले आहे. वर्षानुवर्षे जे प्रकरणे ट्रिब्युनल कोर्टात प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज केली आहे. त्यांनी सांगितले की, सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी सर यांनी मुस्लीम समाजातील अडचणी संदर्भात ज्या काही सुचना केल्या आहेत त्यावर विचार करून मुस्लीम समाजाला फायदा कसा होईल व आर्थिक प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक असा निर्णय घेऊन वक्फ बोर्डाच्या मालमत्तांच्या व्यावसायिक पद्धतीने विकास करण्यात येईल. करमाळा समाजातील सर्व मुस्लीम बांधवांनी हाजी कलीम काझी सर व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सहकार्याबरोबर खंबीर पणे उभा राहुन समाजातील प्रगतीकरिता काझी सरांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली उत्तमोत्तम प्रगती करावी. त्यांच्या सर्व प्रकारची मदत करण्याची आमची तयारी आहे असे प्रतिपादन केले आहे.

यावेळी मौलाना सिकंदर, मौलाना अन्वर, मौलाना रफीक, नायब तहसीलदार हाजी सादिक काझी, अॅड. अलिम पठाण, अॅड. नईम काझी, रहनुमा ट्रस्टचे सचिव सुरज शेख, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान बेग, रो.प. फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, रहनुमा ट्रस्टचे उपाध्यक्ष आझाद शेख, मास्टरमाईंड फिरोज बेग, खजिनदार इम्तियाज पठाण, इकबाल शेख, अयुब शेख, अरबाज बेग, अलिम पठाण, शाहीद बेग, अक्रम मदारी, अयुब मदारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *