घारगावच्या सरपंच सौ.लक्ष्मी संजय सरवदे यांना राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार २०२३ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील घारगाव येथील आदर्श सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना ‘सहारा चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्यावतीने सन २०२३ चा “राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार” जाहीर झाला आहे. सरवदे यांनी आतापर्यंत केलेल्या वृक्ष संवर्धन, आणि वृक्षारोपण, तसेच वृक्ष वाटप, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरवदे ह्या पती संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप, गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप, करुणा काळातील लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देणे, लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगणे, लस घेण्यास प्रवृत्त करणे,
शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण, शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देणे, लोकवर्गणीतून अनेक समाज उपयोगी कामे करणे, डोळे तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, मतिमंद अस्थिव्यंग विद्यालयात वह्या पुस्तके खाऊ वाटप, निराधार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप, सर्वसामान्य व गोरगरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊन त्यांनी अनेक विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. माझी सामाजिक कार्याची दखल घेऊन आतापर्यंत मिळालेले पुरस्कार-
नारी रत्न पुरस्कार,राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार,डॉक्टर बी आर आंबेडकर रत्न अवार्ड २०२३,नारीशक्ती पुरस्कार,छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२३
पती संजय सरवदे यांना देखील सामाजिक कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार-अहिल्या भक्त पुरस्कार,राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार,कोरोना योद्धा पुरस्कार,नॅशनल ग्रेट अचिव्हर्स अवॉर्ड २०२२,गुणवंत कामगार पुरस्कार,रॉयल्टी अवॉर्ड पुरस्कार,समाज भूषण पुरस्कार,आदर्श समाजसेवक अशा अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
आमच्या या कार्याची दखल घेऊन सहारा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अखलाक अहमद यांचे कडून कळविण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, मा.सरपंच अनिता भोसले, मा. सरपंच लोचना काकू पाटील उपसरपंच सतीश पवार, आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व करमाळा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाअध्यक्ष प्राध्यापक शशिकांत नरूटे व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो.त्यांच्या या सामाजिक कामात पती संजय सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *