
करमाळा प्रतिनिधी
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर नव्या उमेदवारांना संधी द्या असे आवाहन माढा लोकसभेचे उमेदवार विनोद सितापुरे यांनी केली आहे.

आजोबा, वडील, चुलता, पुतण्या, मुलगा हेच राजकीय वारस तेच तेच लोक आमदारकीला खासदारकीला उभा राहत आहेत. त्यांचेच वारसदार कशामुळे ? नव्यांना आता संधी देण्याची गरज आहे. हे घराणं ते घराणं मोडीत काढण्याची वेळ आली आहे.

तरी सामान्य मतदारांनी घराणेशाही मोडीत काढून आमच्यासारख्या नवख्या उमेदवाराला मताधिक्य द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार विनोद सितापुरे यांनी केले आहे.
