करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सिंचनासंदर्भातील व्यथा मांडल्या. या मागण्यांसाठी 22 गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

आपण स्वत: या प्रश्नात लक्ष घालू आणि तो मार्गी लावू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मात्र निवडणूक लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असतो आणि मतदान हा तर आपला मुलभूत अधिकार आहे, असे सांगत

बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन सुद्धा केले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बहिष्कार मागे घेत असल्याचे या गावकर्‍यांनी सांगितले.

यापैकी काही गावातील सरपंच तसेच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी (दिदी) बागल यावेळी उपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *