
करमाळा प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून विधवा प्रथा निर्मूलन अभियान राबविण्यात यशस्वी झालोत. हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे परिपत्रक तसेच महाराष्ट्र व गोवा शासनाने कायदा करण्याबाबत अधिवेशनात शून्य प्रहारात प्रश्न उपस्थित

करून चर्चा केली. आता देशात ठिक ठिकाणी या विषयावर अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था शासकीय पातळीवर काम करत आहेत. अनेक ठिकाणी पती निधनावेळी दोन्हीकडून (सासर व माहेर) विधवा प्रक्रीया (कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे,

मंगळसूत्र तोडणे, पायातील जोडवी काढणे) ही प्रक्रिया करण्याबाबत मनाई करतात. कायदा होईल तेव्हा होईल. पण प्रत्यक्षात समाजच पुढाकार घेऊन विधवा प्रथा बंद करण्याबाबत पुढाकार घेऊन बंद करतात. हे आपल्या सर्वाचे यश आहे. मात्र अजून त्यांना सणावाराला सन्मान मिळत नाही. म्हणून मी या पत्राद्वारे विनंती करतो उद्याच्या दिवाळीत लक्ष्मीपूजन पूजेचा मान आपल्या विधवा भगिनींना देऊन सन्मान करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती.
