
करमाळा प्रतिनिधी
रोशेवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामपंचायतीच्या आगामी वाटचालीसाठी गणेश चिवटे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे अशी माहिती अशोक मोरे यांनी दिली आहे.

रोशेवाडीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू आहे. गणेश चिवटेंच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर विशेष फोकस केला आहे. जिल्हा परिषदला रोशेवाडी गावातुन भक्कम सहकार्य मिळाल्यानंतर, आता विकासाची गती अधिक वाढवण्यासाठी चिवटे यांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळवला आहे. गावच्या समस्यांचे निराकरण आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी आता थेट गावपातळीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

विकासासाठी संवाद आणि समन्वयाची भूमिका आहे. ठाम विश्वास आहे की गावचा विकास हा केवळ निधीवर अवलंबून नसून तो लोकसहभागावर आणि योग्य नियोजनावर आधारित असतो. याच उद्देशाने लवकरच रोशेवाडी गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक आणि गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.
या बैठकीचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे असतील
थेट संवाद : ग्रामस्थांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेणे, विकासाचे नियोजन : गावच्या समस्यांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, एकत्रित प्रयत्न : जेष्ठ नागरिकांचा अनुभव आणि लोकप्रतिनिधींची कार्यशक्ती यांची सांगड घालून गावाचा कायापालट करणे, उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल.
जिल्हा परिषदेतील त्यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर, आता ग्रामपंचायत पातळीवर गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वात रोशेवाडी गावातील मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ‘विकास हा सर्वांचा आणि सर्वांच्या सहभागातून’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आता रोशेवाडीच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहेत.
येणाऱ्या काळात ही बैठक रोशेवाडी गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. असेही अशोक मोरे यांनी सांगितले आहे.