
करमाळा प्रतिनिधी
बाजारामुळे आजुबाजुच्या परीसरातील घरांपुढे नागरिक गाड्या लावतात त्यामुळे त्या घरात राहणाऱ्या किवा गल्लीतील लोकांना येण्यासाठी त्रास होतो तरी करमाळा नगर परिषदेने पार्किंगची सोय करावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे. पुढे बोलताना म्हणले की, भाजी विक्रेत्याकडून कर स्वरूपात नगरपालिका पावती फाडत आहे. त्याच

पद्धतीने संबधितांचे पार्किंगची सोय नगरपालिकेने केली पाहिजे तरच इतर नागरिकांना त्रास होणार नाही. याचे नियोजन त्वरित करावे अन्यथा आजुबाजुतील रहिवाशीयांना घेऊन नगरपालिकेवर आंदोलन छेडले जाईल असे माजी नगरसेविका राजश्री माने यांनी सांगितले आहे.

