
करमाळा प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी भावीक भक्तांना मंगळवारी दिनांक 1 जुलै रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दिवसभर दीड लाख मोफत चिवडा पॅकेटचे वाटप करण्यात आले. करमाळा – टेंभुर्णी हायवेवरती सांगवी फाटा या ठिकाणी पंढरपूरकडे पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना गेल्या 23 वर्षांपासून हा उपक्रम महेश भैय्या डोंगरे पाटील यांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.

यावेळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने, जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर महंत डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर, अनिरुद्ध महाराज निंबाळकर, गणपत बसळे, भागवत डुबल,

ओमकार डुबल, ऋषिकेश डुबल, गोविंद डुबल, अक्षय बसळे, तेजस बसळे, ज्योतीराम धुमाळ, गणेश डुबल,संतोष घोंगडे, बाळासाहेब हजारे, रंगनाथ शिंदे, नाना लोकरे, सुहास कदम, कृष्णा धुमाळ, अमोल पवार, हनुमंत शिंदे, हनुमंत अवघडे,

साहेबराव हजारे,गणेश शिंदे, आकाश महाराज, तानाजी फरतडे, महादेव लोंढे, खंडू मोहिते, ज्ञानेश्वर सोनवणे, कृष्णा मोहिते, नागनाथ धीरगुळे, संतोष काळे, शिवाजी मुळीक,नानासाहेब मुळीक, भैरव घोंगडे, रामा धनवे, बाळासाहेब निकम, वस्ताद बापूसाहेब जगदाळे, पैलवान हर्षद जगदाळे, दादासाहेब डोंगरे पाटील, नाथा सुतार, भैरवनाथ बेंद्रे, बिरुदेव धडस,विद्याधर शिंदे, गोपाळ लोणकर उपस्थित होते.