
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘काय व कसे वाचावे ‘या विषयावर महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक सुरेश शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. कार्यक्रमाचा प्रारंभ कवी सुरेश शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते साविंत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी कवी सुरेश शिंदे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात आपल्या सर्वांचे वाचन हे कमी झाले आहे. त्यात काय व कसे वाचावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णने ही आवश्य वाचली पाहिजे. पुस्तके आपल्याला जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र देऊन जातात. असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील म्हणाले की, ज्ञान ही जीवनामध्ये आवश्यक गोष्ट आहे. आपल्याजवळ असलेले संपत्ती एक वेळ संपून जाईल पण ज्ञान मात्र आपल्याला कायम समृद्ध करत राहील त्यामुळेच आपण वाचन केले पाहिजे. या कार्यक्रमास विचारपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यासह प्रा. डॉ. सपना राणी रामटेके, प्रा.डॉ. वंदना भाग्यवंत, प्रा. अभिमन्यू माने, प्रा.डॉ. विनायक खरटमल, प्रा. कृष्णा कांबळे, विष्णु शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता बेरे मॅडम, ज्ञानेश्वर कवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान दामोदरे सूत्रसंचालन सायली निळ तर उपस्थितांचे आभार गायत्री येंगडे हिने मानले. या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
