करमाळा प्रतिनिधी

हिंगणी गावातील विकासकामे तसेच या भागातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. हिंगणी येथे जल जीवन मिशन योजनेच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते करमाळा तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता व पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा डिकसळ पुलाचा प्रश्न आपण अर्थमंत्री अजित दादांच्या माध्यमातून मार्गी लावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

करमाळा तालुका कुकडी लाभक्षेत्रात सर्वात शेवटी येत असल्याने कुकडीचे पाणी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे करमाळाच्या वाट्याला मिळणारे कुकडीचे पाणी उजनी त सोडून ते पाणी प्रस्तावित वाशिंबे व केतुर उपसा सिंचन योजनेद्वारे कुकडीच्या चारीत सोडून ते पाणी कुकडी लाभ क्षेत्रातील जिरायती शेतीला देण्याचे आपले नियोजन असून या योजनेला तत्वतः मंजुरी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी कात्रज, कोर्टी, पांडे, कोळगाव येथे ऍडिशनल ट्रांसफार्मर बसविण्यात आले असून रायगाव आवाटी व राजुरी येथे नवीन सब स्टेशनची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी आवाटीचा लोकार्पण सोहळा पुढील पंधरा दिवसातच होईल असेही त्यांनी सांगितले. याशिवाय सौन्दे येथे नवीन 132 के व्ही सब स्टेशनचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. यामुळे तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.

करमाळा तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला सावडी ते वेणेगाव फाटा या ७० किलोमीटर लांबीच्या रस्त्याला चालूच बजेटमध्ये तरतूद होणार असून यामुळे ग्रामीण विकासाला बळ मिळेल. यावर्षी उजनीची लाईट कपात होणार नसून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी भगतवाडी व गुलमरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी अजित विघ्ने, राहुल सावंत, सूर्यकांत विलास, नितीन राजे भोसले, विवेक येवले, राजेंद्र बाबर यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला अजित विघ्ने, अशोक पाटील, चंद्रहास निमगिरे, गोरख गुळवे, सतीश शेळके, सूर्यकांत पाटील, विलास पाटील, बाळकृष्ण, सोनवणे, राजेंद्र धांडे, उदय ढेरे, विवेक येवले, दादासाहेब निकम, कात्रजचे सरपंच हंडाळ बापू, सुजित तात्या बागल, भाऊसाहेब शेळके,हनुमंत नवले, किरण फुंदे, शंकर कवडे, नितीन राजे भोसले, डॉक्टर केवारे, गौरव झांजुर्णे, गौतम ढाणे आदी उपस्थितत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबनराव जाधव साहेब यांनी केले तर आभार राजेंद्र बाबर यांनी मानले. सूत्रसंचालन नवले यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *