करमाळा प्रतिनिधी
नुकतेच कृषी विभातील कृषी सहाय्यक शेंडे यांनी एक गरीब शेतकर्याला कागदपत्रे ऑनलाईन करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती व ती लाच स्विकारतान त्यांना रंगेहाथ पकडले होते. हि बातमी ताजी आसताना त्याला आठ दिवस

होण्याच्या आगोदरच आज पुन्हा एकदा आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांला तीन हजार रुपये ची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मी अनेक वेळा वेळोवेळी अधिकारी चिरीमिरी साठी

लोकांना नाहक त्रास देत आसल्याचे बातमी दिली होती. परंतु या मधून देखील हे लाचखोर अधिकारी सुधारले नाहीत. आत फक्त बारीक बारीक मासे सापडत आहेत. परंतु भविष्यात मोठं मासे देखील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडणार आहेत हे मात्र लाच खोर आधिकारी यांनी आता तरी बोध घ्यावा अन्यथा तो दिवस पण लांब नाही आपला नंबर लागायला. तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हतबल झालेला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.