
करमाळा प्रतिनिधी
शेतकरी राजेंद्र रामचंद्र खटके रा. केतूर परंतु जमीन मौजे हिंगणी हद्दीमध्ये आहे. कालच्या चक्रीवादळामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.
शेतामधील दीड एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीची पेरणी केलेली होती परंतु यांचे हातात तोंडाशी आलेला घास अवघ्या दहा दिवसातच बाजरी काढणेला सुरुवात करायची होती परंतु काल चक्रीवादळाने पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे. शासनाकडून त्वरित पंचनामा करून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी राजेंद्र रामचंद्र खटके यांनी व्यक्त केली आहे.



