
करमाळा प्रतिनिधी
केम येथे माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांची दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. जाहीर सभा होणार आहे.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा उतारा कोरा करा या मागणीसाठी जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकी मध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करू व शेतकऱ्यांचा चा उतारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर कर्ज माफी करायला तयार नाही शेतकऱ्यांची फसूणूक झाली आहे. तेंव्हा सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, दिव्यांगांनी, असंघटित कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थी राहावे असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष व आदिनाथ स.सा. कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
