करमाळा प्रतिनिधी

आम्हाला आमच्या हक्काचे पाणी उचलू द्या, आमदार नारायण (आबा) पाटील यांनी दहिगाव उपसा योजनेबाबत आपली भूमिका मांडली. जेऊर येथील आयोजित पाटबंधारे विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खांडेकर (अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर) यांचे उपस्थितीत दहिगाव उपसा सिंचन योजनेचा तपशीलवार घोषवारा आमदार

नारायण (आबा) पाटील यांचे समोर सादर करण्यात आला. या आढावा बैठकीसाठी जाधवर (कार्यकारी अभियंता सोलापूर पाटबंधारे विभाग सोलापूर), राजगुरू (उपविभागीय अभियंता कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 करमाळा), प्रकाश बाबा (उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग करमाळा), घोडेस्वार (अभियंता यांत्रिकी उपविभाग भिमानगर), दाभाडे (कालवा निरीक्षक पाटबंधारे उपविभाग करमाळा), आवटे (कनिष्ठ अभियंता कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12

करमाळा) तसेच शिंदे व देवकाते (निवृत्त कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग) हे उपस्थित होते. यावेळी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दहिगाव व कुंभेज येथील दोन्ही पम्प गृहातील विद्युत पंपाची स्थिती तसेच आवर्तन काळात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली. यावेळी करमाळा तालुक्यासाठी दहिगाव उपसाचे 1.81 टी एम सी पाणी हे उजनीत राखीव आहे पण हे पाणी संपूर्ण उचलले जाऊ शकत नाही. यामुळे आता आवर्तन कालावधी वाढला जावा आणि हक्काचा पाणी साठा संपे पर्यंत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व मागणी नुसार आवरतने मिळाली पाहिजेत अशी आपली भूमिका असून येत्या कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत आपण हा विषय मांडणार असल्याचे सांगितले. लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाणी साठ्या पर्यंत पाणी पोहोच केले जावे अशी सूचनाही आमदार नारायण पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आमदार कार्यालयाच्या वतीने जिल्हा अधीक्षक खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सभापती अतुल भाऊ पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सचिव प्रा. अर्जुन सरक आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *