करमाळा प्रतिनिधी
माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), मनसे, आठवले गट तसेच इतर मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या “कमळ” या चिन्हापुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केले आहे.
खासदार या नात्याने गेल्या पाच वर्षांत निंबाळकर यांनी केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करवून घेतली असून त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काहींचे काम सुरू आहे तर काही कामे अद्याप सुरू व्हायची आहेत.
केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार हे स्पष्ट असल्याने विरोधी उमेदवार निवडून दिला तर पुन्हा पाच वर्षे विकास खुंटणार आहे. हे लक्षात घेऊन ज्या पद्धतीने करमाळा मतदारसंघातून विकासाचे व्हिजन असलेला उमेदवार आमदार संजयमामांच्या रूपाने व त्याआधी खासदार म्हणून आपण निंबाळकर यांना निवडून दिले व त्याचे सर्व तऱ्हेचे फायदे या मतदारसंघाला झाले. हे लक्षात घेऊन पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करून विकासाची कास धरावी असे आवाहन आव्हाड यांनी केले आहे.