
करमाळा प्रतिनिधी
कुगाव ता. करमाळा व शिरसोडी ता. इंदापुर ला जोडणारा महत्वाकांक्षी पुल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे साकारतोय ही करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे. विशेषतः या पुला प्रमाणेच उजनीच्या पाण्यावर या पुलापेक्षाही कमी अंतरातील पोमलवाडी ते चांडगाव आणि आगोती ते गोयेगाव याही पुलाची मागणी सध्या जोर धरत आहे.

वस्तुतः कुगाव ते शिरसोडीचे अंतर जास्त असुनही महाराष्ट्र शासनाने या पुलासाठी निधी मंजुर केलेला असुन, केवळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दृढ निश्चयामुळे हा पुल साकारत आहे. परंतु या पुलासाठी मंत्री व इंदापुरचे आमदार दत्तामामा भरणे यांचे प्रमाणेच करमाळ्याचे आमदार व अजितदादांचे शिलेदार संजयमामा शिंदे यांनीही सहकार्य केले आहे व शिफारस केलेली आहे. या व्यतिरिक्त पोमलवाडी ते चांडगाव पुलाची देखील घोषणा दोन कार्यक्रमातुन खुद्द उपमुख्यमंत्री

अजितदादा पवार यांनी करून बजेटमधेही काम घेण्यास पाठपुरावा केलेला होता. याशिवाय आ. संजयमामा शिंदे यांनीही कुगाव ते कळाशीसह, पोमलवाडी ते चांडगाव व आगोती ते गोयेगाव करीता पाठपुरावा केलेला होता. तसेच अजितदादांच्या माध्यमातुनच करमाळा तालुक्याचे दृष्टीने अतिमहत्वाचा असणाऱ्या डिकसळ ते कोंढार चिंचोलीच्या पुलासही निधीची मंजुरी घेत कामही चालु केले आहे. हे सर्व पुल सोलापुर ते पुणे जिल्ह्याला जोडणारे पुल असुन या पुलाचे उद्घाटनाच्या

कार्यक्रमासाठी प्रोटोकॉल प्रमाणे दोन्ही तालुक्याचे आमदारांना पत्रिकेसह, कोनशिलेवर नाव अधोरेखित करणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम कोणाची एकटी ग्रामपंचायत करत नाही तो सर्व बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आ. संजयमामा शिंदे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेसह सर्व ठिकाणी टाकण्यात यावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे करमाळा माढा विधानसभेचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.