
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील शिवसेनेच्या गटबाजीमुळे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती मा. शिवसेना तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले आहे परंतु करमाळा तालुका शिवसेना गटबाजीला कंटाळून तसेच रिटेवाडी उपसा सिंचन, कुकडी तलावाचे पाणी मांगी तलवात सोडावे यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले परंतु त्याची दखल घेतली नाही या महत्त्वाच्या कारणामुळे मी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती देवानंद बागल यांनी दिली आहे.


