करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य निवडीबाबत पुन्हा ये रे माझ्या मागल्या, केवळ राजकारणासाठी आदिनाथचा उपयोग झाल्याचे सांगुन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिनाथ सहकारी साखर

कारखान्याच्या प्रशासकीय सदस्यपदी विलासराव घुमरे, डाॅ.वसंत पुंडे आणि दिपक देशमुख यांच्या निवडी झाल्या आहेत. याबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आपले स्पष्ट मत मांडले.यावेळी ते म्हणाले की आमदार रणजितसिंह

मोहिते-पाटील यांच्या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करुन या निवडी झाल्या आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना आज जो काही अडचणीत आला आहे यास कारणीभूत ठरलेल्या गटातील व्यक्ती जर का प्रशासकीय

सदस्य म्हणून निवडला जात असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. गेली अनेक वर्षे आदिनाथ कारखान्याच्या सत्तेचा वापर केवळ राजकारणासाठी करुन मनमानी कारभार केल्याने आदिनाथ अडचणीत आला आहे. आदिनाथ कारखाना चुकीच्या पध्दतीने


मागील काही महिन्यापुर्वी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आदिनाथ कारखान्यास संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यास माजी आमदार नारायण (आबा) पाटील, माजी आमदार जयवंतराव

जगताप आणि बागल गटाचे प्रतिनिधी हजर होते. यामुळे आदिनाथवर प्रशासकीय सदस्य नेमताना जगताप व पाटील गटास विचारात घेतले गेले पाहिजे होते.पाटील गटात सहकाराचे ज्ञान, अनुभव आणि विशेष म्हणजे आदिनाथ बद्दल आस्था असणारे अनेक कार्यकर्ते आहेत. यामुळे सदर शिफारस देताना त्यांची नावे आठवली नाहीत का ? केवळ विलासराव घूमरे, डाॅ. वसंत पुंडे, महेंद्र पाटील आणि दिपक देशमुख अशी चारच नावे सदर पत्रामध्ये नमुद होती. यातील तीन नावांचा विचार झाला. या चारही नावांची शिफारस करत असताना पाटील गटासोबत कसलीही चर्चा झाली नाही हे समस्त सभासदांना समजणे गरजेचे आहे. प्रशासकीय सदस्य यांची मुदत केवळ सहा महिनेच असते आज ना उद्या या निवडी सुध्दा बदलाव्या लागतील. पण आजमितीस पाटील गटातील कार्यकर्त्यांच्या भावना मात्र या निवड प्रक्रियेमुळे दुखावल्या असल्याचे सांगून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. सहकारी गट म्हणुन काम करत असताना पाटील गटास विचारात घेऊन प्रशासकीय सदस्यांच्या निवडी होणे गरजेचे होते इतरांच्या कडून आम्ही अशी अपेक्षा धरली नाही, परंतू मोहिते-पाटील नेतृत्वाकडून खुप अपेक्षा होत्या. पाटील गट कार्यक्षम असून आदिनाथ कारखाना हा या गटाचे श्रध्दास्थान असलेल्या कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी उभारला आहे. आदिनाथ बाबत राजकारण झाले याची खंत वाटते असे तळेकर यांनी आवर्जून सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *