
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात समाधान कारक पाऊस झाला आहे. त्याच बरोबर उजणी धरणाच्या पाणी साठया मध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना नवीन पीकाची लागवड करायची आहे म्हणून लाईट पुर्ववत आठ तास करावी यासाठी पालकमंत्री व तालुक्याचे आमदार यांनी यात लक्ष घालून तात्काळ प्रशासनाला आदेश करावे अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक किरण कवडे यांनी केले आहे.

