करमाळा प्रतिनिधी

जिद्द चिकाटी प्रामाणिकपणे परिश्रम करण्याची आपली तयारी असेल तर जगाच्या कुठल्याही पाठीवर माणूस यशस्वी जीवन जगू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धेश्वर दास असून त्याची शुन्यातून वाटचाल प्रेरणादायी आहे अशी मत भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले. श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीचा

कर्मचारी सिद्धेश्वर उर्फ बापू दास यांच्या पस्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नाशिक कबीर होते. उपस्थितीमध्ये भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, मेजर संतोष कुंभार, उद्योजक शुभम कुलकर्णी, पंकज अंदुरे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना संतोष काका कुलकर्णी म्हणाले की, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणीच आईचे निधन झाल्यानंतर यांचे डोक्यावरून

वडिलांचे पितृ छत्र हरपल्यानंतर बापू दास यांनी खचून न जाता जामखेड चौसाळा येथून करमाळा येथे येऊन औद्योगिक वसाहतीचे चेअरमन महेश दादा चिवटे व नासिर कबीर यांच्या सहकार्याने कमलादेवी औद्योगिक वसाहती मध्ये कर्मचारी म्हणून कामास सुरुवात केली. आपल्या कुटुंबाचा भार सांभाळूनही बहिणीला मेव्हण्याला आधार देत भाचीच्या लग्नासाठी

शिक्षणात सहकार्य केले आहे. परिस्थिती जेमतेम असतानाही वडीलाच्या नंतर बहिणीवर व त्यांच्या कुटुंबावर मायेचे छत्र बापूंनी लहान वयामध्ये दिले. यातून बापूचे मोठेपण सिद्ध होते. कुठलीही काम करण्यासाठी बापू सतत तत्पर असतो. त्यामुळे सर्वांचा तो आवडता कर्मचारी म्हणून नावारुपाला आला आहे. कुठलेही काम लहान किंवा मोठे नसते. आपण काम कसे करतो यावर त्या कामाची प्रतिष्ठा अवलंबून असते. हे बापूंनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. त्यामुळे युवा पिढीने खऱ्या अर्थाने याचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे. आपण सत्यता प्रामाणिकता जिद्द चिकाटीने कुठल्याही क्षेत्रात जर मनापासून काम केले तर यश निश्चित असल्याचे संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *