करमाळा प्रतिनिधी

खांबेवाडी येथे जलजीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करमाळा तालुक्याचे युवा नेते जेऊरचे कर्तव्यदक्ष सरपंच पै. पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती बोरगावचे युवा नेते संजय पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, संदीप गायकवाड, पांडे ग्रामपंचायत चेमाजी सरपंच बाळासाहेब मोटे, माजी उपसरपंच भिवा वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, पांडे ग्रामपंचायत

उपसरपंच आदिनाथ शिंदे, युवा नेते पै. शिवाजी नरुटे, खांदेवाडी चे पोलीस पाटील अनिल देवकते, ग्रामपंचायत सदस्य शहाजी शिंदे, आबासाहेब टकले, रामभाऊ उर्फ डॉन शिंदे, महेंद्र शिंदे, आप्पा शिंदे, तात्या शिंदे, सुशील नरुटे, नाथाभाऊ नरुटे, हवालदार संभाजी शिंदे, बापूराव नरुटे, गोरख हाके, गोरख कोळेकर, पैलवान पप्पू चोरमले, संदीप टकले, गोपाळ टकले, अण्णा गोपने, दादासाहेब नरुटे, बापू देवकते, ईश्वर शिंदे, किशोर शिंदे, मच्छिंद्र कांबळे, ज्ञानदेव गोपने, पैलवान विश्वजीत नरुटे, नागेश लांडगे, संतोष कोळेकर, दिनकर हाके, आजिनाथ शिंदे, गोपाळ टकले, सतीश कांबळे, बाळू कांबळे, धुळा चोरमले, बिरू वायकुळे, माधव टकले, बापू गोपने, सतीश नरुटेसर, निखिल महानवर, बापू टकले, बिनू टकले, सोमनाथ शिंदे, आदी जण उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज भैय्या पाटील म्हणाले की, खांबेवाडी गाव हे विकासापासून वंचित राहू देणार नाही जलजीवन योजनेतून 56 लाख 50 हजार रुपये एवढा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी आणलेला आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये करमाळा माढा मतदारसंघातील मतदारांनी नारायण आबा पाटील यांना आमदार केले. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. दहिगाव उपसा सिंचन योजना आबांनी सुरू केली, कुकडी धरणामधून करमाळा तालुक्याला 18 आवर्तने मिळवून दिली, करमाळा तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न आबांनी सोडवला, करमाळा बस स्टॅन्ड ला आबांनी भरपूर निधी मिळवला, जेऊर बस स्थानकाला आबांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला, कुटीर रुग्णालय जिल्हा उपरुग्णालय करमाळा येथे 80 बेडचे आधुनिक सुसज्ज असं हॉस्पिटल उभा केले, मांगी तलावातून कॅनल द्वारे सतरा गावांना पाणी देण्याचा आबांनी प्रयत्न केला, कोळगाव धरणा मधून उपसा सिंचन मार्फत पूर्व भागाला पाणी मिळवून दिले, करमाळा तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न गंभीर होता परंतु आबा मुळे तालुक्यामध्ये सबस्टेशन भरपूर झाल्यामुळे विजेचा प्रश्न मिटला असे अनेक कामे आबांनी केलेले आहेत. खांबेवाडी गावातील ग्रामस्थांना स्वच्छ घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचं प्रयत्न केले जाईल. गावातील काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील. सतीश नरुटे सर यांनी आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *