दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे

सतीश नीळ यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी करमाळा.
करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नीळ यांनी म्हटले आहे की पूर्व भागातील शेतकर्यांना दहीगाव उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे.या योजनेच्या पाण्यावर उस,केळी,फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.शेतकर्यांच्या दारात समृद्धीचे दिवस येत असतानाच उजनी जलाशयातील पाणी पातळी खालावल्याने ही योजना पाण्याअभावी बंद झाली.परिणामी लाखो रुपये खर्च करून आणलेली पिके वाया गेली.ज्या शेतकर्यांना विहीर बोअरला पाणी होते अशा शेतकर्यांनी प्रयत्न करुन पिके जगवली.सद्या उजनी धरणातील पाणी साठ्यात ३३टक्क्यांपर्यत वाढ झाली असून सध्य स्थितीत दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या जँकवेल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.प्रशासनाने शेतकर्यांन प्रती सहानुभूती पूर्व विचार करुन दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर,प्रांतधिकारी कूर्डवाडी, जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत

चौकट
सोलापूर शहराला पिण्यासाठी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता असताना वर्षभरात २०ते २२टीएमसी पाणी नदीद्वारे सोडावे लागते.परिनामी येथील दहीगाव उपसा सिंचन योजने सह उजनी पाणलोट क्षेत्रातील शेती धोक्यात येते.त्यामुळे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करुन पाण्याचे योग्य नियोजन करावे

सतिष नीळ
संचालक मकाई साखर कारखाना.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *