![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-maza.jpeg)
केळीच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी : शंभुराजे जगताप यांची पालक मंत्र्यांकडे मागणी –
करमाळा प्रतिनिधी
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/IMG_20230508_174115-1024x1019.jpg)
रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/shivm3-1024x309.jpeg)
विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/स्कूल-जाहिरात-३-1024x1024.jpeg)
व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे ,
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20221017-WA0542-1024x1024.jpg)
जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत .
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)